Saturday, July 17, 2010

लाख क्षण अपूरे पडतात

लाख क्षण अपूरे पडतात

आयुष्याला दिशा देण्यासाठी

पण, एक चुक पुश्कळ आहे

ते दिशाहीन नेण्यासाठी

किती प्रयास घ्यावे लागतात

यशाचं शिखर चढण्यासाठी

पण, जरासा गर्व पुरा पडतो

वरुन खाली गडगडण्यासाठी


देवालाही दोष देतो आपण

नवसाला न पावण्यासाठी

कितींदा जिगर दाखवतो आपण

इतरांच्या मदतीला धावण्यासाठी


किती सराव करावा लागतो

विजश्रीवर नाव कोरण्यासाठी

पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो

जिंकता जिंकता हरण्यासाठी



कितीतरी उत्तरं अपुरी पडतात

आयुष्याचं गणित सुटण्यासाठी

कितीतरी अनुभवातनं जावं लागतं

आयुष्य कोडं आहे पटण्यासाठी


विश्वासाची ऊब द्यावी लागते

नात्याला जिवनभर तारण्यासाठी

एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे

ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी

कधीतरी माझे श्वास ऎक

कधीतरी माझे श्वास ऎक,
प्रत्येक उच्छ्वासाला तुझंच नाव घेतात ते!
कधीतरी माझ्या एकांताला भेट,
तू जितका स्वतःचा नसशील ,
तितका माझ्या एकांताचा झाला आहेस!
कधीतरी माझे ह्रदयकंप ऎक,
तुझ्याच ह्र्दयकंपाचा नाद ऎकू येईल तुला!
कधीतरी माझ्या डोळ्यांत बघ,
तुझंच रूप दिसेल तुला!
कधीतरी हातात हात घे माझा,
तुझ्या स्पर्शासाठी आतुर या शरीराने,
तुला नाही गारठवलं, तर सांग मला!
कधीतरी माझ्याकडे प्रेमाने बघ,
त्या एका द्रुष्टिक्शेपाने तुला,
माझ्या प्रेमात नाही पाडलं,तर सांग मला!

काहीच नको मला पण

काहीच नको मला पण
साथ तुझा देशील ना
आयुष्यात मी धडपडताना
हाथ तुझा देशील ना
कही नको मला पण
समजुन मला घेशील ना
सगळे दोष देताना
विश्वास तू ठेवशील ना
काहीच नको मला पण
मला तुझा म्हणशील ना
एकटी कधी रडताना
मला जवळ घेशील ना
आणखी कही नको मला पण
माज्या बरोबर येशील ना
काळओखात मी चालताना
मी आहे म्हणशील ना
काहीच नको मला पण
सावरून मला घेशील ना
जेव्हा मला गरज असेल
माझ्यासाठी येशील ना
काहीच नको मला पण
तू माझा होशील ना
तू माझा होशील ना
नको नको म्हणता म्हणता खुप काही मागितले
एवढाच मला देशील ना ............
एवढच मला देशील ना..........

आवडली आहे मला एक मुलगी

आवडली आहे मला एक मुलगी



आज आल्या चार ओळी मनात ,
केल्या कोणातरी वर ,
आवडली आहे मला एक मुलगी ,
ती हि इंटरनेट वर  

आहे ती फार दूर ,
शेकडो मैला (miles) अंतरी ,
pan राहते ती इथेच ,
अगदी माझ्या हृदया सरी

माझ्याशी बोलायला तिला ,
मला थोडा मानवाव लागतं,
ती बोलते फार कमी ,

म्हणून जरा  हसवावं लागतं


ओळख आमची नाही पूर्ण ,
आणि मैत्री फार नवी ,
मनात आहे एक ज्योती ,
मला हि मैत्रीण हवी .

छत्री ...

तुला आवडणारा पावसाळा
आता जवळ आलाय
पण तु ...
तु मात्र दुर गेलीस
गेल्या पावसाळ्यात
कोरडी ठेवलेली छत्री
यंदा मात्र भिजणार....
आणी गंमत म्हणजे
ती छत्री आता मीच संभाळणार ...
आठवतय ... पाऊस आल्यावर
तु नेहमी छत्री पकडायचीस
आणि मी .... मी तुला पकडायचो,
अगदी घट्ट ...
त्या इवल्याशा छत्रीचही झूकत माप
तु मलाच द्यायचीस
आणी स्वतः मात्र भिजत चालायचीस ...
त्या पावसाचही तुझ्यावर तेवढच प्रेम
जणू तुझ्यासाठीच तो यायचा
भिजलेल्या कमरेवर हात गेला
की त्या ढगांचा गडगडाट व्हायचा ...
गेल्या वर्षी पाऊस गेला
आणी पाठोपाठ तुही गेलीस ...
आता आली आहेस पण
पाऊस येण्याआधीच निघालीस ...
तुला जायचय तर जा
मी नाही म्हणत थांब
पण त्या पावसाला काय उत्तर देउ
ते तरी सांग ....
तु मला फ़सवलस हे
मी त्याला नाही सांगणांर
पण काही केल तरी या
डोळ्यातल्या सरीं नाही थांबणार
पाऊस आला तरी , नाही आला तरी
मला मात्र यंदाच्या पावसात
भिजावच लागणार .........

का विचारलं नाही?

का विचारलं नाही?


तीचं त्याच्यावर अफाट प्रेम. पण ते व्यक्त न करता मनात उगाचच कुढत
राहायचं. मीच का त्याला प्रपोज करावं, या भावनेमध्ये अहंकारही असतो आणि
नकाराची भीतीही!
पाऊस वेशीवर येऊन थांबलाय, आभाळ ढगांनी ओथंबलंय, कसलीशी हुरहुर मनात
दाटलीय... जून सुरू झालाय आणि कॉलेज कॅम्पसमध्ये मन पुन्हा पुन्हा फिरून
येतंय. फायनल एक्झामनंतर दोन-अडीच महिन्यांचा विरह आता मिटू पाहतोय...
त्याच्या प्रेमळ आठवणी मनात भरून राहिल्यात, किमान या पावसात तरी तो
प्रपोज करेल का, या प्रश्नाचा भुंगा मन पोखरतोय... गेलं वर्षभर नजरानजर
होताना प्रेमाची देवघेव होत राहिली पण, ती आता शब्दांत तो मांडेल का, या
विचारात ती आहे...
तो आवडतो, त्याच्याशी बोलावसं वाटतं, त्याने आपल्याशीच बोलावं, किमान
जास्त बोलावं, आपल्यालाच महत्त्व द्यावं असं सतत वाटत राहतं... हेच प्रेम
आहे हे कळतं. कधीतरी त्याच्या डोळ्यांमध्येही चमक दिसते, तो कधी विचारेल,
प्रपोज करेल याची वाट पाहत झुरणं नशिबी येतं... दिवस पुढे जात राहतात पण,
तो काही विचारायचं नावच काढत नाही, कदाचित नकार मिळण्याच्या भीतीने... मग
तीच त्याला प्रपोज करायचं ठरवते, पण... हा 'पण'च मध्ये येतो आणि ती केवळ
वाट पाहण्यावरच समाधान मानते.
९९ टक्के वेळा तोच तिला प्रपोज करतो. तिने त्याला प्रपोज करण्याचं प्रमाण
एखाद टक्क्याहूनही कमीच. तो प्रपोज करत नाही आणि मुलगी तो सल आयुष्यभर
मनात ठेवून कुढत राहते.
एखादा मुलगा आवडूनही त्याच्याकडे प्रेम व्यक्त करणं मुलींना का जमत नाही?
शिक्षणात, करिअरमध्ये मुली पुढे गेल्या तरीही आज यात बदल झालेला नाही, हे
विशेष. मुलींना सतत दडपणात राहावं लागतं, तिच्या भावना मोकळेपणाने व्यक्त
करू शकत नाही, तिच्यावर 'वाईट चालीची' म्हणून शिक्का बसतो, अशी कारणं
पूवीर् दिली जायची. आजही या कारणांमधून मुलींची सुटका झालेली नाही.
मुलींना एक्स्पोजर मिळतंय, भरपूर शिक्षण आणि करिअरच्या संधी, भरभक्कम
पगारही सोबतीला आहे, पण मानसिकता मात्र बदललेली नाही. प्रेमात आणि
लग्नाच्या मागणीत पुरुषानेच पुढाकार घ्यावा, असा पुरुषप्रधान समाजाचा
घालून दिलेला नियम सर्वचजणी तंतोतंत अंमलात आणतात. 'मी विचारलं तर लोक
काय म्हणतील', हा सोशल स्टीग्माही मुलींच्या मनात असतो. एखाद्या
प्रेमविवाहात मुलीने मुलाला प्रपोज केल्याचं कळलं तर, ही मुलगी नक्कीच
'चालू' असणार, किंवा जरा 'ज्यादा'च दिसते, अशा प्रतिक्रिया उमटतात.
घरातल्या आणि समाजातल्या संस्कारांचा पगडा मुलींना बाजूला करता येत नाही,
ही वस्तुस्थिती आहे. आपल्या समाजात अजूनही प्रेमाला फारशी प्रतिष्ठा
नाही, तरीही मुली प्रेम करतात पण, व्यक्त करण्याच्या वेळी सामाजिक बंधनं
वगैरे मध्ये आणतात. याच्यामागे इगो प्रॉब्लेमही असतो! मी कशाला त्याला
विचारू, तो नाही म्हणाला तर? तो पराभव कसा पचवावा? त्यापेक्षा त्याला
विचारू दे! नकाराची भीती दोघांनाही असते पण इगो प्रॉब्लेमही असतोच. काही
वेळेला यामागे अनुभवाची शिदोरीही असते. सीनिअर मुलींचा, ताईचा, वहिनीचा,
मैत्रिणींच्या मैत्रिणींचा अनुभव. एखाद्या मुलीने प्रपोज करून मग दोघांचं
प्रेम जमलं आणि लग्न झालं की पुढे आयुष्यभर नवऱ्याकडून ते ऐकून घ्यावं
लागतं. काही भांडण झालं की, 'मी नव्हतो आलो तुझ्याकडे, तूच आली
होतीस...', हे एवढ्या वेळा ऐकावं लागतं की लग्नाशिवाय राहिलो असतो तर बरं
झालं असतं असं वाटायला लागतं. याचा विचार करून अनेकजणी प्रपोज करण्याचा
विचार मनातच ठेवत असतील किंवा कदाचित असंही होत असेल की, त्यांनी
विचारायच्या आधी मुलंच अधीर होत असतील प्रपोज करायला!
हे पावसाळी धुंद-कुंद वातावरणही आहे प्रेमात पडायला आणि ते व्यक्त करायला
लावणारं... मग आता येणाऱ्या पावसात विचारूनच टाका... नाहीतर मग पुढच्या
वषीर् जेव्हा ढग दाटून येतील, तेव्हा पुन्हा एकदा आठवणींनी मन भरून येईल
आणि एकच प्रश्न सतावेल,

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
म्हणजे माझ्यासाठी जणु उन्हाळ्यातही
पावसाळा
तुझी
मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं
एखादं जाळीदार पान....
जसंजसं
त्याचं आयुष्य वाढत जातं
तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातं
तुझ्या
मैत्रिविना आयुष्य धुसर धुसर वाटेल...
तशी वाट सापडेल जगण्याची...
पण...हातात
माझ्या हक्काच असं काही नसेल...
मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही
आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला हवा
येणारे
येतात अन जाणारे जातातही...
मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि
सहज होवुन जाते ... करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...
म्हणुनच वाटतं...तुझ्या माझ्या मैत्रिला
भय नाही
मैत्रिचा ठेवा हा असाच जपुन ठेव
तु हास अन दु:ख तुझी माझ्याआड लपवुन ठेव
उद्या जर नसलोच तुझ्यासोबत तरी माझे शब्द
असतील...
तू हसत रहा माझ्यासाठी..तुला बघुन माझे शब्दही हसतील
शब्दांनी
नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या
सुख-दु:खात

कॉलेजमध्ये असताना

कॉलेजमध्ये असताना
एक मुलगी मला आवडली
तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना
कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..
वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति
कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला
अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली
आली होती माझ्या कंपनीमध्ये
मुलाखत देण्यास
आणि मि होतो तिथे
तिची मुलाखत घेण्यास
मुलाखत सोडली
आणि गेलो कॉफी प्यायला
विचारले तिला आहेस एकटी
कि आहे कोणी तुझा दादला..?
तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेला
जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला
तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला
आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला.
मनाने पुढाकार घेतला
आणि वाणिने त्यास प्रतिसाद दिला
एकदा सांगितले तिला माझ्या मनातले
आणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन मोकळे..
ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळी
माझ्या अंतर्मनाने ओळखली
ति म्हणाली किती वेळ लावलास तु...?
कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु...

आज तु हवी होतिस.....

आज तु हवी होतिस.....
तुझ्या नसण्यची ख॑त अजुनही आहे,
पाणावलेल्या डोळ्या॑तुनी तुझेच सप्तर॑ग दिसत आहेत..

आज तु हवी होतिस.....
तेच लाजर निखळ हास्य तुझ ज्यात वेडा होतो मी,
तुझ्याच प्रेमाच्या दुनियेत सजलो होतो मी,

आज तु हवी होतिस.....
चेहर्‍याचे ते सु॑दर रुप ज्यात होत माझ सर्व जीवन,
सुकलेल्या फुलाला ही मिळालेल कोमल योवन,

आज तु हवी होतिस.....
जीतकी आहेस तु दुर की वाराही स्पर्श करणार नाही,
कितीही रडलो तरीही तुझ येणच असणार नाही,

आज तु हवी होतिस.....
तरीही सजवलाय आजचा दिवस तुझ्यासाठी,
अश्रु॑ची फुले बनवुनी आठवणी॑चा गजरा केलाय तुझ्यासाठी

ति आली पण मी तिला नाही पाहिल !

ति आली पण मी तिला नाही पाहिल !
ति बसली. तेव्हा लक्ष गेल !!
सगळी मुल तिच्याकडेच पाहत होती !
पण माझ भाग्य थोर तिची घायळ नजर मला न्याहळीत होती !!
तिच्या डोळ्यातुन सुटलेला पाहुण तो तीर !
नाही धरु शकला मांझ र्‍हुदय धीर !!
तिचे ते कळी पडलेले गाल !
पाहुन वाटल आपली असावी अशी माल !!
वाटल तेव्हा आजच विचाराव !
काँलेजच्या कट्यावर तिला घाटव !!
त्यासाठी आलो मी वर्गातुन खाली !
मला पाहुन हसली ति गाली !!
तेव्हा वाटल आता जाव !
काय बोलते ते पाहव !!
त्याच वेळी नक्षिबान खाल्ली पलटी !
माझी पावले फिरली उलटी !!
केली होती मेदुने र्‍हुदयावर मात !
प्रियकराने टाकली होती कात !!
मित्रा ने विचारल का सोडलास दम !
मि बोललो मला सोडवायचे आहे
माझ्या आयुष्यातले सम !!!

आला श्रावण

ओथंबिले घनु काळे
झाली तळीही सावळी
द-या-खो-या निनादती
गुंजे ढ्गांची आरोळी.
.
.
.
कुठे सोनसळी ऊन
कुठे मिठ्ठास साऊली
झीणी-झीणी छेडी बीमं
सारी सॄष्टी मुग्धावली.
.
.
.
झाली पुसट-विरळ
लांब डोंगराची रेघ
क्षितीजाच्याही पल्याड
धरा भेटशी का मेघ ?
.
.
.
वाट एकली-दुकली
जाई शोधीत साजणं
दामिनीच्या संग-संग
सखा आला गं श्रावण.
.

एक उदासी...

एक उदासी खोलीभर दरवळत राहते जणू
रक्तामध्ये दु:ख तुझे विरघळत राहते जणू

सौजन्याचा रुमाल घेऊन पुसत राहतो गळा
चारित्र्याची धुतली कॉलर मळत राहते जणू

घरात एकाकी म्हातारी रडत राहते अशी
तुडुंब भरली घागर की डचमळत राहते जणू

एक अनामिक हुरहुर आहे शिल्लक कोठेतरी
शेपुटतुटकी पाल कुणी वळवळत राहते जणू

जुन्या डायर्‍या कपाटामधे अशा नांदती अता
विस्कटलेल्या त्या वर्षांची चळत राहते जणू

दिसू लागली आहे आयुष्याची तिसरी मिती
पुर्वग्रहांची भिंत उभी कोसळत राहते जणू..

संध्याकाळी चिंतेने ते काळवंडते असे,
माझे दुखणे नभास अवघ्या कळत राहते जणू

कणाकणाने संपत जातो माझा चांगुलपणा
सून कुणाची घरात अपुल्या जळत राहते जणू !

मैत्री....

मैत्री म्हटली की 
आठवतं ते बालपण
आणि मैत्रीतुन मिळालेल
ते खरंखुरं शहाणपण



कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही

मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यांत श्रेष्ठ
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्ट

मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सुत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सुप्त भुक

मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्र मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजुन
चिंब-चिंब नाहली

मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देउन
गालातल्या गालात हसणारे

अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी !!

अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी !!!
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी,
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी,
घर जवळ येताच पुढे निघून जावी.
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी,
दिसलो की गालवर छान खळी पडावी.
कधी हसता हसताच ती रडावी,
कधी रडता रडताच खुद्कन हसावी.
हक्काने आपल्यावर रागवावी,
मग कही न बोलताच निघून जावी.
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी,
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट्‌ करावी.
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी,
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी.
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी.
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी.
सुखात सगळ्यांना सामिल करावी,
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी.
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी,
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी.
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी,
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी.
थोडा वेळ मग ती शांत रहावी,
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी.
ती बरोबर असली की आधार वाटावी,
अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी !!

सौंदर्याचा शब्दकोष तू …

ओठांच्या पाकळ्या फुलताना ,
त्यांना मी काय म्हणू ?
लाघवी हास्य ते,गुलाबाचे फुल जणू……..

घायाळ तुझ्या नयन तीरांनी ,
शुद्धीत कसा मी राहू ?
मादिरेच प्यालाच तो,शिंपल्यातील मोती जणू ………..

न्हालेल्या त्या केसांचा,
सुगंध कसा मी घेऊ ?
पावसाळी मेघ ते,मोरपंखांचा पिसारा जणू ……

गालावरची खळी तुझ्या,
नजरेत कसा या साठवू ?
सौंदर्याच्या मंदिराचा,सोनेरी तो कळस जणू …..

मखमली कांती तुझी ,
रंगात कसा मी सांगू ?
बदामी तारुण्य ते,केवड्याचे फुल जणू ………

हरिणीची चाल तुझी ,
शब्दात कसा मी रेखू ?
सडा पारिजातकाचा मागे , चंद्राची तू कोर जणू …….

मलमली तारुण्य तुझे ,
शब्दांत कसा मी बांधू ?
शब्दच रिते माझे, सौंदर्याचा शब्दकोष तू ………….

दु:खानंतर सुख आल्यावर.........

दु:खानंतर सुख आल्यावर
माणूस जरा गोंधरतो
"असं अचानक सुख का?"
असं देवाला विचारतो

आधीतर दु:खी माणसाला
सुख ओळखताच येत नाही
नशिब इतकं दयावान का?
याचं कारण कळत नाही

दु:खाची सवय झाली की
सुख विचित्र, नकोसं वाटतं
नशिबाने दाखवलेली दया
स्वाभिमानाला सुख नकोसं वाटतं

"आपण आपल्या दु:खात बरे, या
उशीरा येणाऱ्या सुखाची गरज काय?
कदाचित आपण सुखाच्या लायक नाही
अशा हावरटपणाची गरज काय?"

खरंतर देवाने दिलेलं हे बक्षिस
आपण प्रेमाने स्विकारायचं असतं
पुढे परत हवंतेवढं दु:ख
दोन क्षण सुखात जगायचं असतं काय

खर प्रेम

हजारो यातना झाल्या तरी
एकदातरी खर प्रेम करुन बघावच लागत
एक दिवस माझ्या चारोळ्या भरभरुन गातील,
लोकांच्या मनात काहुर माजवतील,
शब्द कधी आनंदाने चोहीकडे नाचतील,
चारोळ्या वाचुन कुणालातरी आपले दिवस आठवतील
चारोळ्या लिहिताना शब्दांना सुरेख जोडायचे,
सगळ्या आठवनींना एकत्र करायचे,
जिवनाचे सगळ्यांना दर्शन घडवायचे,
चारओळीत आपन असच सजायचे
ऋणानुबंध होते नात्याचे,
ऋणानुबंध होते अद्रुश्य स्पर्शाचे,
ऋणानुबंध होते प्रेमाचे,
कधीहि न विसारता येणाऱ्या हरेक क्षणाचे
माझ्या श्वासात तुला मी सामावल,
चारोळ्या लिहुन प्रेम पत्र पाठवल,
आज एकांतात तुझ्या आठवणिने रडवल,
अस एका जिवाने दुसऱ्या जिवाला विसावल
पावसाच पाणी कस बेभान झालय,
नद्यांतुन कस ओसंडुन वाहतय,
बघ वाऱ्यालापण कसा वेग आलाय,
निसर्गाच्या प्रेमाचा इथे साक्षाकार झालाय
तुझ्याशिवाय कविता पूर्ण होत नाही,
तुझ्याशिवाय शब्द कधी जुळतच नाही,
तुझ्याशिवाय माझ्याकडे कोणता विषयच नाही.

मन

मनाला एकदा असेच विचारले

का इतका तिच्यात गुंततो ?

नाही ना ती आपल्यासाठी

मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही तुला

त्रास मला भोगावा लागतो

अश्रूंमधे भिजून भिजून

रात्र मी जागतो

मी म्हटले मनाला

का स्वप्नात रमतो ?

तिच्या सुखा साठी तू

का असा दुखात राहतो ?



मन म्हणाले

प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा

आपण स्वतःला विसरतो

सार काही तिच्यासाठी

ईतकेच मनाला समजावतो...........

ती अगदी समोर दिसते...

ती अगदी समोर दिसते...
-
दरवाजा उघडताच
ती अगदी माझ्या डोळ्यांसमोर दिसते
तिलाच पाहून हल्ली मी विचारात पडतो...
-
ती माझ्या बरोबर
अगदी कॉलेजला सुद्धा सोबत जायची
येताना सुद्धा माझ्या सोबतच यायची...
-
तिच्या सहवासात
वेळ अगदी हसत हसत निघून जायची
घरी पोहचलो कधी हे समजत नसायचे...
-
दिवसभर आम्ही
वेड्या सारखे बाहेरच भटकत रहायचो
फिरता फिरता अचानक संद्याकाळ व्हायची...
-
तिच्या प्रेमात
मी मला स्वतःला विसरत चाललो होतो
तिच्यामुळेच मी सर्वांशी जिंकत आलो होतो...
-
काय सांगू तुम्हाला
हल्ली मी घराचा दरवाजा सारखा उघडतो
दरवाजा उघडला की, ती अगदी समोर दिसते...
.
.
.
माझी सायकल हो, अगदी समोर दिसते...

पुन्याच्या पोरी रे पुन्याच्या पोरी

पुन्याच्या पोरी रे पुन्याच्या पोरी
बुक्क्यान्चा मार पन बोलायची चोरी


दिसायला असेल पडलेला प्रकाश जरी
मगावं स्ट्राबेरी तर मिळते मारी


कुनी असेल स्मार्ट तर कुनी असेल गोरी
जवल जाउन बघा यांची पाटिच कोरी


झाल्या किती मोठ्य़ा तरी एकतील लोरी
पेन्टहाउस ला जशी एक अट्याच मोरी


थोड्या आहेत बाभाळी अन थोड्याश्या बोरी
कुठलीही पोरगी तशी आहे फ़ाशीचिच दोरी


पुन्याचा पोरिंचा असतो हजारदा रीटेक
ब्याटींग करता करता उडालेली असते विकेट


TVS ची SCOOTY आनी BAJAJ ची SUNNY
श्याम्पू लावला तरी सुटत नाही फ़नी


बाहेर जाताना यान्चे तोंड असते झाकलेले
असावेत यान्ना स्वताचे वीकपॊईन्ट समजलेले


पोरिंना वाटते आम्हि पावसाच्या गारा
अग उडालेला फ़्युज तुमचा तुम्हि तुट्लेल्या तारा


सान्गायला सरळ असतात या पोरि वागायला पाजी
खानार्र्याने जपुन खावी हि कार्ल्याची भाजी


म्हनुन पुन्याच्या पोरी रे पुन्याच्या पोरी
बुक्क्यान्चा मार पन बोलायची चोरी

शेवटची भेट...........

शेवटची भेट...........
मला ती आज शेवटच भेटणार होती
दुख:शी भेट माझी आज तिथेच घडणार होती
आजचा दिवस सहज सरत होता
"अरे जरा दमानं" सांगितल तरी ऐकत नव्हता

तिला आज भेटुच नये असे वाटत होतं
मन माझं तिच्या निरोपाच्या
भयाने आतल्याआत तुटत होतं
पण पुन्हा तिचं ते मोहक रुप,
ते गहिरे डोळे मला दिसणार नव्हते
एकदाच शेवटच म्हणत
आज मन तिच्यासाथी हरणार होतं

कधी नव्हे ते आज पोहोचलो मी वेळेवर
नेहमी जिथे बसायचो बसलो
हात टेकवत त्या बाकावर
आज बागेतली गुलाबी फ़ुलं
मला काळी कुळकुळीत दिसत होती
पाखरांचे ते किलबीलणे मला विरह गाणी वाटत होती

अचानक बागेतलं वातावरण शांत झालं
"ही वादळापुर्वीची शांतत रे"!!
जणु मला इशा-याने सांगितल
हळु हळु काळे ढग जमु लागले
माझा हा विरह सोहळा पाहण्यास जणु ते आतुर झाले

तेवढ्यात ती आल्याची चाहुल लागली
तिने मला पाहताच लगबगीने पावलं टाकली
ती जवळ जवळ येत होती आणि पाऊशी सुरु झाला
सोबत त्याच्या विजाही कडाडु लागल्या
"आज तिच्या नजरेला नजर देउनच बोलणार"
मनात मी शपथ घेतली
पण ती समोर येताच माझ्याच
नजरेने माघार घेतली, नजर माझी भेदरली

ती शांत उभी होती
"उशीर का केलास"? मी विचारले
"अरे काम होतं जरासं!!" ती उत्तरली
बरं ठिक आहे म्हणत!! मी मान वळवली

का रे काय झाले ? तिने विचिरले
कुठे काय !! काही नाही ?
म्हणत मी तिच्या त्या प्रश्नाला टाळलं

"अछ्चा माझं लग्न ठरलय तो युएसए ला आहे"! तिने हसत सांगितल

माझं काय? मी झुरत विचारलं
अरे सॉरी घरातले तयार नव्ह्ते
मी तरी काय करु ?? सगळं गणितच चुकले
चल मी निघते म्हणत ती उठु लागली
पाठी न बघताच ती पुढे चालु लागली

नजर माझी तिच्या पाठमो-या
आकृतीकडे फ़क्त पाहत राहीली
हळु ह्ळु तिची ती आकॄती
माझ्या डोळयात फ़क्त भीजत राहीली
सोबत पावसाची सरही वाढु लागली
त्या पावसाच्या पाण्यात माझ्या
स्वप्नांची कागदी नाव बुडु लागली.........

Wednesday, July 14, 2010

मनमाझे ..... तुझ्याकडे आहे


मनमाझे ..... तुझ्याकडे आहे 

मन माझे तुझ्याकडे आहे,
कधी अंतर्मनात झाकून बघ.
मन गुंतवण्यात
वेगळीच मजा आहे,
तुझेही माझ्यात गुंतवून बघ.


प्रेमाच्या
गोड गोष्टी करताना
हळूच मिठीत मला घेऊन बघ.
कल्पनेतली ती उबदार
झुळूक
प्रत्यक्षातही कधी अनुभवून बघ.


क्षण काही जगलोत सोबत
आठवणीत
त्या माझ्या रमून बघ.
अथांग सागर तुझ्यावरच्या प्रेमाचा,
मनात
माझ्या बुडून बघ.


स्वप्न तुझेच फक्त डोळ्यात माझ्या
तू ते
माझ्या डोळ्यांनीच बघ.
बघता बघता तुला स्वतःला
हळूच माझेही स्वप्न
पाहून बघ.


जिवापाड प्रेम लावीन
तु थोडे तरी लावून बघ
मी
तर वेडी झालीच आहे
तुही प्रेमात माझ्या वेडा होऊन बघ.


जसा
तू सामावलायस माझ्यात
तसचं तुझ्यातही मला सामावून बघ
जरी तू वेगळा
अन् मी वेगळी
एकरूपता तरी जाणवेल बघ.


नाही करणार एवढे प्रेम
दुसरे कोणी
हवी तर परिक्षा घेऊन बघ
फक्त परिक्षेचा निकाल पहायला
जगी
तुझ्या मला असू दे बस्स !!

एक गोड प्रेमपत्र

एक गोड प्रेमपत्र 

खरच विश्वास नाहि मला
हेच ते डोळे आहेत का?जे मला नेहमी टाळायचे
तेच आज माझ्या प्रेमाने भरुन आले आहेत !
हा भास तर नाहि ना पन मला ते जानवतय…

नक्किच i can fill that

जेंव्हा तु एकदा फोन ठेवतान sweet dreams म्हणताना
हळुच म्हनालीस miss u तेंव्हाच कळल होत मला
तुही माझ्या प्रेमात पडली आहेस !

खरच मला नाहि अजुन विश्वास
तु कित्ति गोड हसतेस हल्लि…
मध्य रात्रिचे तुझे sms वाचताना
मन माझ कित्ति आनंदि असत !

i m just falling into love........ .i m just crashing into love

मी तुझ्या प्रेमात वेडा तर नाहि ना होत आहे?

का तु माझ्या प्रेमाला नाहि नाहि म्हनुन मला त्रास दिलास…
पन तो त्रास हि कित्ति मस्त होता जितक कि तुझ लाजुन माझ्या मीठित सामावुन जान !

खरच नाहि मला विश्वास अजुनही कित्ति जपतेस तु मला त्यामुळेच कि काय तुझी आठवन
आलि कि मी गुदमरुन जातो…कारन तु कुठेच नसतेस तरिहि फ़ार जवळ असतेस, अगदी जवळ !

काय मस्त प्रवास होता तो तितकाच जीवघेना…
तुला विचारन्या पासुन ते, तु हो म्हने पर्यंतचा…
तुच सांगितलस मला कि हे जग कस वाइट असत ते आणि तु कित्ति चांगला आहेस ते ! 

राणी तुझि फ़ार आठवन येते…. आज पहाटे माझ्या गाली
तुझ्या अधरांचा स्पर्श झाला… तु जवळ नव्हतीसतरिही जीव माझा मोहरुन गेला…!

राणी ये ना लवकर ….

तुझ्या वाचुन जगन्याची सवय झाली आहे… अश्रुंवाचुन रडण्याची सवय झाली आहे …!
तुझी फ़ार आठवन येते 

I LOVE YOU.

Tuesday, July 13, 2010

भावपूर्ण चारोळ्या

तू बोलत नाही काही
अन् मी ही बोलत नाही
पण क्षण आठवांचे
गुणगुणतात काही


अबोल शब्दातही
प्रीतीचा एक अर्थ आहे
माझ्या मनाच्या स्वप्नासाठी
माझे प्रेम नि:स्वार्थ आहे...............



जीवन कसे पक्ष्यां सारखे असावे
कुठे ही उडावे आणि कसे ही जगावे
आणि मरताना देखिल कधी कुणावर
आपले ओजे न देता जावे


माझ्यासाठी प्रेम म्हणजे
मोठ्ठ कुतूहल आहे
पडले नाही तरी लागते
अशी एक चाहूल आहे


आठवणींच्या मागे धावलो
कि माझं असंच होतं.
आठवणीं वेचत जाताना,
परतायचं राहुन जातं.


जळुन तृप्त होतो गुलमोहर,
तरी पाउसाची भेट नाही.
गुलमोहराचं जळणं,
कधीच का पावसाला कळत नाही


पाय मुकेच चालतात,
परी मन आठवणींना ठेचाळते.
नजरे समोर गाव तुझे अंधुक,
अन ही वाट स्वप्नांकडे जाते.


आपली पहीली भेट.. नवी ओळख..
एक सुगंध मनात ठेऊन गेली.
तसं पाहीलं तर अनोळखीच होतो आपण,
तरी एक बंध मनात ठेऊन गेली.



प्रेम म्हणजे काय…
हवा असलेला तिचा नि:शब्द सहवास,
नी, तिनं माळलेल्या गज-याचा
मी ऊर भरुन घेतलेला श्वास.



हिरवळीवर धावणारी पायवाट,
किती अस्मितेने वागते.
हिरवळ ओसरली की,
निपचीत पडुन पुन्हा वाट पाहते.



शब्द होऊ पाहणा-या भावनांची
जेव्हा गळ्यापर्यंत येऊनही कत्तल होते,
तेव्हा कुठे जाऊन
एक कविता जन्माला येते.

तुझा 'अनोळखी'पणा ही
आता ओळखीचा वाटायला लागला आहे.
अनोळखी 'तु' असलीस तरीही
तो माझ्या ओळखीचा झाला आहे.


तुझ्या आठवणींचा एक थेंब
नेहमी माझ्या डोळ्यांच्या कोप-यात असतो,
पानांवर दव चमकावे
तसे नजरेत माझ्या चमकतो.

खुणवीत आहे काही
तिळ तुझ्या गालावरचे,
मलाच समजत नाही
ते शब्दात कसे सांगायचे.



फुल कधी म्हणत नाही की
सुगंध नेहमी वा-यावरच फिरतो,
कारण, त्यालाही माहीत असतं
कितीही दुर गेला तरी तो फुलाचाच असतो.

पानांवर सठलेल्या थेंबासारखे
रंग मैत्रीचे,
रोजरोज भांडुण घट्ट होणारे
हे बंध मैत्रीचे.



असे कितीतरी बंध
जुळले असतील तुझ्या आयुष्यात…
एक बंध माझ्याही मैत्रीचे
जपशील का शेवट पर्यंत तुझ्या मनात…



कोवळ्या उन्हात न्हाऊन
नखशिखांत तु नटलेली,
जणु, सोज्वळ ती फुलराणी
ओली आताच फुललेली.



पिकलेल्या पनाला
वा-याची तमा नसते.
म्हणुनच कदाचीत
ते जास्त सळसळते.


एकांताला सोबत घेऊन
समुद्र किना-यावरुन चालताना,
वाळुनेही जागा सोडावी पायाखालुन ?
लाट माझ्यापासुन ओसरताना…!!!


संध्याकाळची वेळ
सुर्य दमुन अस्ताकडे झुकलेला,
नि:शब्द सांगुन जातो
'उगवणार आहे मी पुन्हा एकदा मावळायला'



सगळंच बरोबर करताना
काही चुका करुन गेलो,
त्यात न विसरना-या व्यक्तीलाही
मी आज विसरुन गेलो,



आठवणींतल्या आठवणींना
हळुच आठवायचं असतं.
डोळे पान्हावलेले असले तरी
मंद गालातल्या गालात हसायचं असतं.



आठवणींचा हा गुच्छ,
कोप-यात मनाच्या साठवण्यासाठी.
सोंग करुन विसरल्याचं,
पुन्हा एकदा आठवण्यासाठी.



माझ्या कविता-चारोळ्या म्हणजे,
माझ्या भावना, माझे अनुभव.
माझ्या मनाच्या पात्यावर साठलेले,
माझ्याच आठवणींचे दव.


माझ्या ओंजळीतुन
तुझ्या आठवणींची नेहमी पिसं मी उडवावी…
अलगद अशी उडुन ती,
पुन्हा माझ्याच पदरत पडावी…



माझ्या ओठावरचं हसु,
आहे साक्ष तु आठवल्याचं.
आठवणी तुझ्या आठवुन,
क्षणभर जगाला विसरल्याचं



थंडीचं एकदा
प्रेम जडलं पहाटेवर,
आजही ते एकत्र चालताना दिसतात
सकाळच्या वाटेवर.



ती वा-याची एक झुळुक
हळुच शेजारुन जाणारी,
जाता जाता पाहत वळुन
मंद गालातल्या गालात हसणारी.


दिवसागन श्वास नविन
श्वासागन भास नविन
पण तुझ होकारानेच सुरु होइल
माझ्या आयुष्याचा प्रवास नविन !!!


कोमल तुझ्या चेहर-या वरुन
अश्रु का ओघळावे
गालात फ़क्त खळीने
फ़ुलायचे हे डोळ्यांनाही न समजावे ?


तुझ्या नाजुकपणावर लिहायचं म्हणजे,
मला खुपच अवघड वाटतं.
कविता-चारोळ्या तर लांबच,
'नाजुक' शब्द सुद्दा जरा जड वाटतं.


मोकळ्या हवेचा श्वास दे,
मला पुन्हा एकदा जगण्याचा भास दे.
आज चांदण्याही विजलेत बघ,
त्यान्हाही चमकण्याचा ध्यास दे.


कोणाची तरी ओढ लागली
की ओढाताण होतेच !
वणवा लागतो मनाला,
नि आयुष्याचे कोरडे रान होते.