Saturday, April 11, 2015

Destiny

नेहमीच नसतं अचूक कुणी, 

घड्याळ देखील चुकतं राव.

जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता 

निसटून जातो हातून डाव.

पडत जातात उलटे फासे 

घरासोबत फिरतात वासे,

अश्या वेळी मोडू नये 

धीर कधी सोडू नये.

नशिबाच्या नावानेही 

उगीच बोटं मोडू नये.

भरवश्याचे करतात दावे, 

आठवू नये त्यांची नावे.

सगळी दारं मिटतात तेव्हा 

आपणच आपला मित्र व्हावे...

मग अचूक दिसते वाट, 

बुडण्या आधीच मिळतो काठ,

खडक होऊन हसत हसत 

झेलता येते प्रत्येक लाट,

ज्याला हे जमलं त्याला 

सामील होतात ग्रह तारे,

केवळ तुमच्या शिडासाठी 

वाट सोडून वाहतील वारे,

म्हणून म्हणतो इतकं तरी 

फक्त एकदा जमवून बघा,

आप्त, सखा, जिवलग यार, 

स्वतःत शोधून पहा.…!

– गुरु ठाकूर

Tuesday, March 24, 2015

शब्द्

शब्दांनीच शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनीच शिकवलय रडता रडता हसायला.
    शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
    शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ.
शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा.
    शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी
    आणि शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी...
 
"म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल
आणि जो मन: जिंकेल तो जग जिंकेल".

Saturday, March 21, 2015

आमची श्रीमंती

कमीपणा घ्यायला शिकलो
म्हणून...
आजवर खूप माणसं कमावली...
हिच आमची श्रीमंती...!!

नाते सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असावी ...
आणि
नाते टिकवावयाचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची
सवय नसावी ...

ताकद आणि पैसा हे
जीवनाचे फळ आहे.
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम
हे जीवनाचे मूळ आहे.
जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या
प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणारे
भरपूर आहेत.
पण हरलेल्या क्षणी पाठीशी
उभे राहणारे किती, यावरून
माणसाची श्रीमंती कळते.

तुमच्या पाठीशी किती जण
आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही
किती जणांच्या पाठीशी आहात
याला महत्त्व आहे.
"एखादे संकट आले की,
समजायचे त्या संकटाबरोबर
संधी पण आली.
कारण संकट हे कधीच
संधीशिवाय एकटा प्रवास
करत नाही.
संकट हे संधीचा राखणदार
असते. फक्त संकटावर मात
करा, मग संधी तुमचीच आहे".

"वडाचे झाड कधीच पडत
नाही, कारण ते जेवढे वर
वाढते तेवढेच ते जमिनीखाली
पसरते. जीवनात तुम्हाला
जर पडायचे नसेल तर स्वत:
चा विस्तार वाढवतेवेळी
चांगल्या मित्रांची सोबत
वाढवा".

आयुष्यात सुई बनून रहा.
कैची बनून राहू नका. कारण
सुई दोन तुकड्यांना जोडते,
आणि कैची एकाचे दोन
तुकडे करते...

आवडले तर नक्की पुढे पाठवा....

Wednesday, January 14, 2015

भोगी

रसाळ उसाचे पेर
कोवळा हुरडा अन् बोरं
वांगे गोंडस गोमटे
टपोरे मटार पावटे

हिरवा हरभरा तरारे
गोड थंडीचे शहारे
गुलाबी ताठ ते गाजर
तीळदार अन् ती बाजर

वर लोण्याचा गोळा
जीभेवर रसवंती सोहळा
डोळे उघडता हे जड
दिसे इवल्या सौख्याचे सुगड

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा !

Sunday, January 11, 2015

साम्य - भवितव्य

कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते कोणत्या बाबतीत आहे ?
जरा ओळखुन दाखव!”
मित्राने माझ्यापुढे कोडे टाकले. मला विचारचक्रात अडकवुन स्वतः पसार झाला.

मी विचार करु लागलो, “बांधकामाची विट आणि कोंबडीचे अंडे यात काय साम्य असणार?” खुप विचार करुनही उत्तर न सापडल्यामुळे शेवटी शेजारी सुरु असलेल्या बांधकामावरुन दोन विटा आणि बाजारातुन अर्धा डझन अंडी घेउन घरी आलो. खूप निरीक्षण केले पण उत्तर सापडले नाही.


दुसर्या दिवशी तोच मित्र पुन्हा माझ्याकडे आला, “काय सापडले काय उत्तर?” मी नकारार्थी मान हलविली आणि “आता तुच काय ते साम्य दाखवं!” असे म्हणुन ती अंडी आणि विटा त्याच्यापुढे ठेवल्या .

मित्राने हातात अंडे घेतले. ते उभे ठेवले आणि दाबले, पण ते फ़ुटले नाही. मग त्याने अंड्याला आडवे केले आणि दाबले, ते चटकन फुटले. मग त्याने दोन फ़ुटावरुन हातात उभी धरलेली विट खाली सोडली, विटेला काहीच झाले नाही. नंतर तेवढ्याच अंतरावरुन त्याने आडवी धरुन विट खाली सोडली, आता मात्र विट फुटली. 

मित्र माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला  “विट आणि अंडे उभे असेपर्यंत फ़ुटत नाही, आडवे होताच फ़ुटते.  हे त्या दोघांमधील साम्य.

माणुस त्या विट किंवा अंड्यासारखाच -
तो जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे, सजग आहे, तो पर्यंत कोणीच त्याचे भवितव्य बिघडवू शकत नाही. पण जर का तो सुस्तावला, जरा आडवा झाला, की त्याचे भवितव्य फ़ुटण्याची शक्यता बळावते." खंबिरपणे उभे राहा. जग तुमचे काही बिघडवू शकत नाही. 

Tuesday, October 28, 2014

मला आवडलेली काही वाक्ये

. .. वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. ,
आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.. . ..
〰〰〰〰〰
. .. ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला
अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. ,
कारण त्यांच्यामुळेच मला 
कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.. . .
〰〰〰〰〰
. .. "चांगली वस्तु"., "चांगली व्यक्ती"., "चांगले दिवस".. ,
यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर समजते".. . ..
〰〰〰〰〰
. .. आशा सोडायची नसते.,
निराश कधी व्हायचं नसतं.. .
अमृत मिळत नाही.. ,
म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . ..
〰〰〰〰〰
. .. जर तुमचे डोळे चांगले असतील तर
तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. ,
पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे
संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..

〰〰〰〰〰
. .. "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले
की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".. . ..
〰〰〰〰〰
. .. पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. .
त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला
यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . ..
〰〰〰〰〰
. ..
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. ,
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात.,
तर आयुष्यभर एकटे राहाल.. . ..
〰〰〰〰〰
. .. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. ,
कारण ही विसरता येत नाही.,
अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. . ..
〰〰〰〰〰
. .. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. ,
परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे
हे मन ठरवते.. , पण
आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार
हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.. . ..
〰〰〰〰〰
. .. हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना 
दिर्घायुष्य लाभू दे., आणि 
आयुष्यभर माझे यश पाहून 
दुसऱ्यांना स्फूर्ती मिळून दे.. . ..
〰〰〰〰〰
. .. प्रेम म्हणजे., समजली तर भावना.,
केली तर मस्करी., मांडला तर खेळ.,
ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास.,
रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. .
〰〰〰〰〰
. .. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून
दूर राहिलेले चांगले
.. , कारण.,
"समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा.,
आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम".. . ..
〰〰〰〰〰
  . .. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही.,
सुविचार पण असावे लागतात.. ,
आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा
कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.. . ..
〰〰〰〰〰
. .. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून
चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. ,
अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.. . ..

〰〰〰〰〰
. .. तुम्हाला जर मित्र हवे असतील,
तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. ,
चांगले काम करायचे मनात आले
की ते लगेच करून टाका.. . ..
〰〰〰〰〰
. .. केवड्याला फळ येत नाही
पण त्याच्या सुगंधाने तो
अवघ्या जगाला मोहवून टाकतो.. .
〰〰〰〰〰
. .. तुम्ही कायम सदैव खुश
राहा आणि आनंदात जगा.. . ..
〰〰〰〰〰

. .. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल
तर तो आकाशाला विचारा
.. . ..
〰〰〰〰〰
. .. बचत म्हणजे काय
आणि ती कशी करावी हे
मधमाश्यांकडून शिकावं.. . ..
〰〰〰〰〰
. .. गुलाबाला काटे असतात.. ,
असे म्हणून रडत बसण्यापेक्षा
काट्यांना गुलाब असतो.,
असे म्हणत हसणे उतम.. . ..
〰〰〰〰〰
. .. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.. . ..
〰〰〰〰〰
. .. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो.,
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. ,
पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.. . ..
〰〰〰〰〰
. .. मृत्यूला सांगाव., ये
कुठल्याही रुपाने ये.. , पण
जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत
माझ्याकडे आह., तोपर्यंत
तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.. . ..
〰〰〰〰〰

. .. ज्याच्या जवळ सुंदर विचार
असतात तो कधीही एकटा नसतो
.. . ..
 〰〰〰〰〰
. .. मोती बनून शिंपल्यात
राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन
चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. . ..
〰〰〰〰〰
. .. जखम करणारा विसरतो., पण जखम
ज्याला झाली तो विसरत नाही
.. . ..
〰〰〰〰〰




. .. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो.,
माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो.. ,
पण जमिनीवर राहून माणसासारखे वागायला शिकलो का.. . ..???

Monday, October 27, 2014

जीवन तयाचं नाव

जिंकण म्हणजे काय ते
           हरल्याशिवाय कळत नाही. .......
दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही.........
सुख म्हणजे काय ते दुस-याच्या हास्यात
शोधल्याशिवाय कळत नाही......
समाधान म्हणजे काय ते आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही.......
मैत्री म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही.......
आपली माणस कोण ते
संकटांशिवाय कळत नाही ........
सत्य म्हणजे काय ते डोळे उघडल्याशिवाय कळत नाही.......
उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही......
जबाबदा-या म्हणजे काय हे त्या सांभाळल्या शिवाय कळत नाही....
काळ म्हणजे काय हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही.......
मृत्यू म्हणजे काय हे तो समोर आल्याशिवाय कळत नाही......
चालणारे दोन्ही पाय किती विसंगत, एक मागे, एक पुढे असतो, पुढच्याला अभिमान नसतो, मागल्याला अपमान नसतो, कारण त्याना ठाऊक असत क्षणात हे बदलणार असत, ह्याच नाव "जीवन" आहे.