Tuesday, October 28, 2014

मला आवडलेली काही वाक्ये

. .. वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. ,
आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.. . ..
〰〰〰〰〰
. .. ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला
अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. ,
कारण त्यांच्यामुळेच मला 
कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.. . .
〰〰〰〰〰
. .. "चांगली वस्तु"., "चांगली व्यक्ती"., "चांगले दिवस".. ,
यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर समजते".. . ..
〰〰〰〰〰
. .. आशा सोडायची नसते.,
निराश कधी व्हायचं नसतं.. .
अमृत मिळत नाही.. ,
म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . ..
〰〰〰〰〰
. .. जर तुमचे डोळे चांगले असतील तर
तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. ,
पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे
संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..

〰〰〰〰〰
. .. "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले
की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".. . ..
〰〰〰〰〰
. .. पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. .
त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला
यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . ..
〰〰〰〰〰
. ..
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. ,
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात.,
तर आयुष्यभर एकटे राहाल.. . ..
〰〰〰〰〰
. .. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. ,
कारण ही विसरता येत नाही.,
अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. . ..
〰〰〰〰〰
. .. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. ,
परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे
हे मन ठरवते.. , पण
आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार
हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.. . ..
〰〰〰〰〰
. .. हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना 
दिर्घायुष्य लाभू दे., आणि 
आयुष्यभर माझे यश पाहून 
दुसऱ्यांना स्फूर्ती मिळून दे.. . ..
〰〰〰〰〰
. .. प्रेम म्हणजे., समजली तर भावना.,
केली तर मस्करी., मांडला तर खेळ.,
ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास.,
रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. .
〰〰〰〰〰
. .. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून
दूर राहिलेले चांगले
.. , कारण.,
"समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा.,
आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम".. . ..
〰〰〰〰〰
  . .. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही.,
सुविचार पण असावे लागतात.. ,
आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा
कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.. . ..
〰〰〰〰〰
. .. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून
चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. ,
अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.. . ..

〰〰〰〰〰
. .. तुम्हाला जर मित्र हवे असतील,
तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. ,
चांगले काम करायचे मनात आले
की ते लगेच करून टाका.. . ..
〰〰〰〰〰
. .. केवड्याला फळ येत नाही
पण त्याच्या सुगंधाने तो
अवघ्या जगाला मोहवून टाकतो.. .
〰〰〰〰〰
. .. तुम्ही कायम सदैव खुश
राहा आणि आनंदात जगा.. . ..
〰〰〰〰〰

. .. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल
तर तो आकाशाला विचारा
.. . ..
〰〰〰〰〰
. .. बचत म्हणजे काय
आणि ती कशी करावी हे
मधमाश्यांकडून शिकावं.. . ..
〰〰〰〰〰
. .. गुलाबाला काटे असतात.. ,
असे म्हणून रडत बसण्यापेक्षा
काट्यांना गुलाब असतो.,
असे म्हणत हसणे उतम.. . ..
〰〰〰〰〰
. .. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.. . ..
〰〰〰〰〰
. .. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो.,
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. ,
पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.. . ..
〰〰〰〰〰
. .. मृत्यूला सांगाव., ये
कुठल्याही रुपाने ये.. , पण
जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत
माझ्याकडे आह., तोपर्यंत
तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.. . ..
〰〰〰〰〰

. .. ज्याच्या जवळ सुंदर विचार
असतात तो कधीही एकटा नसतो
.. . ..
 〰〰〰〰〰
. .. मोती बनून शिंपल्यात
राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन
चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. . ..
〰〰〰〰〰
. .. जखम करणारा विसरतो., पण जखम
ज्याला झाली तो विसरत नाही
.. . ..
〰〰〰〰〰




. .. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो.,
माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो.. ,
पण जमिनीवर राहून माणसासारखे वागायला शिकलो का.. . ..???

No comments: